चिमुकलीचा गळा घोटून पित्याची आत्महत्या : पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयाने शहर सुन्न

चिमुकलीचा गळा घोटून पित्याची आत्महत्या : पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयाने शहर सुन्न

दैनिक राष्ट्र उदय विशेष प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या स्वप्निल दीपक गायकवाड (वय 34) या अंमलदाराने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा घोटून खून केला आणि नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. ही दुहेरी घटना समजताच नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला.

स्वप्निल हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल रात्री उशिरा त्यांच्या घरात ही घटना उघडकीस आली. भैरवी स्वप्निल गायकवाड (वय 6) ही बालिका पाळणा बांधण्याच्या लोखंडी हुकाला गळफास लावून मृतावस्थेत सापडली, तर बाजूलाच स्वप्निल गायकवाड यांचा ही मृतदेह आढळून आला.

कौटुंबिक विघटन, तणाव आणि आत्मविस्मृती

स्वप्निल यांचा काही महिन्यांपूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला होता. कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना इतरांचे जीवन वाचवण्याचं काम असतं, पण येथे स्वतः पोलीसच हतबल होऊन जग सोडून गेला.

स्वप्निल यांच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई-वडील एकटे उरले आहेत. काही वर्षांपूर्वी एका भावाचा गंभीर आजाराने मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. अशा काळात एकमेव आधार असलेला मुलगाही गेला आणि त्यांच्या जीवनात अंधार दाटून आला.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

मन सुन्न करणारे प्रश्न

आजवर अनेकांनी आत्महत्येपासून माघार घ्यावी म्हणून सल्ले दिलेले असतात, समुपदेशन केलेले असते. पण ज्याच्या खांद्यावर इतरांना आधार देण्याची जबाबदारी होती, तोच जर तुटून पडला, तर मग समाजाने विचार करायला हवं नाही का?

एक चिमुकली – निष्पाप, निरागस आणि जीवनाच्या सुरुवातीला असलेली – तिला या जगातून का जावं लागलं? तिचा काय दोष होता? कोण म्हणतं फक्त महिला हतबल होतात – येथे एक पुरुषही तुटून कोसळला, आणि संपूर्ण समाजासाठी एक गंभीर संदेश ठेवून गेला.

तरुण पिढीला साकडे

आज आपल्या भोवतालच्या तणाव, कौटुंबिक संघर्ष, नात्यांतील दुरावा आणि मानसिक आरोग्य याबद्दल बोलणं गरजेचं झालं आहे. कोणताही निर्णय शेवट नसतो. आई-वडिलांचा, आपल्या लोकांचा विचार करा. तुम्ही हरलात, तर तुमचं संपूर्ण घर हरतं.

हा शोकांतिकेचा प्रसंग तरुण पिढीला जागं करेल का? की अजूनही आपण सोशल मीडियावर फिल्टर लावून जीवनाला झाकत बसू?
आत्महत्येचा विचार मनात आला, तर थांबा… विचार करा… आणि मदत घ्या.

> जीवन अमूल्य आहे. संकटं आली की मोडायचं नाही – झेलायचं आणि उभं राहायचं.

🙏 भैरवी आणि स्वप्निल यांच्या आत्म्यास शांती लाभो…
आई-वडिलांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

*सचिन सरदारसिंग राजपूत: एक प्रेरणादायक हँडबॉल शिक्षक ज्याचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन* 🕊️💔

 

*सचिन सरदारसिंग राजपूत: एक प्रेरणादायक हँडबॉल शिक्षक ज्याचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन* 🕊️💔

🎓 सचिन राजपूत हे शिरपूर एज्युकेशन सोसायटीमध्ये हँडबॉल शिक्षक होते, ज्यांना हृदयाच्या झटक्यात जीव गमवावा लागला. खेळताना त्याला येणाऱ्या तीव्र झटकेमुळे तातडीने *डॉक्टर विनोद पावरा यांच्या गुरुदेव हॉस्पिटलमध्ये* दाखल करण्यात आले. 🏥 डॉक्टरांनी सात ते आठ वेळा DC आणि CPR दिला, ज्यामुळे थोडा आशा मिळाला, परंतु आणखी पुढे त्याला धुळ्याच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
🩺 *आरोग्यधूत आरोग्य मित्र बापू राजपूत* यांच्या नेहमीच्या सामाजिक सेवेतील संपर्कातील असलेल्या वैधकिय क्षेत्रातील दांडगा संपर्क या वेळेस कामी आला आणि विना विलंब त्यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक *डॉक्टर विकास राजपूत* यांना तातडीने माहिती देऊन सर्व तयारी येण्या पूर्वी करून ठेवली गेली. तिथे विघ्नहर्ता हॉस्पिटलचे टीमने दहा दिवसांच्या अविरत प्रयत्नांनंतरही दुर्दैवाने यश मिलाळे नाही. 😢💔


दहा दिवस शर्तीचे प्रयत्न केलेत मात्र या सर्व प्रयत्नांना अपयश आले या सर्व घडामोडींमध्ये डॉक्टर विनोद पावरा आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल ची पूर्ण टीम डॉक्टर विकास राजपूत यांच्यासह या परिवारातील काका बाबांचे मार्गदर्शन तर होतेच परंतु या सर्व सख्खे व चुलत भावांमधील जे टीमवर्क पाहायला मिळाले (दीपक अतुल विकी करण निलेश लुकेश आशिष दिपेन) त्याला एकदा खरोखर सलाम केला पाहिजे एवढे धाडसी निर्णय त्यांनी घेतले व अविरत 100% घरी कसा परत येईल यासाठी प्रयत्न केले *त्यांच्या या प्रयत्नांना साथ दिली त्यांच्या सर्व मित्रांनी त्यात निखिल सुचित जगदीश*  याच्या सह अनेकांची नावे घेता येतील  परंतु चिरंजीव देवांश साठी सचिन ला वाचविण्याचे केलेले प्रयत्न अपूर्ण पडले
सचिन सरदारसिंग राजपूत हे एक आदर्श शिक्षक होते, ज्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त खेळाचे शिक्षणच नाही, तर शारीरिक आणि मानसिक विकासासाठीही प्रेरित केले. 🏐💪 त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे आणि प्रेमामुळे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण केले. ❤️✨ परंतु दुर्दैवाने, हृदयाच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण समुदाय शोकात आहे.

Read More *सचिन सरदारसिंग राजपूत: एक प्रेरणादायक हँडबॉल शिक्षक ज्याचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन* 🕊️💔

💔 **दौलत वैद्य परिवारातील एक अनमोल व्यक्तिमत्व हरपले** 🕊️

💔 **दौलत वैद्य परिवारातील एक अनमोल व्यक्तिमत्व हरपले** 🕊️

कुटुंबाची थोडी चूक घेऊन त्यात अधिक प्रेम आणि समर्पण भरा. प्रेमाचे धागे कधीही तुटत नाहीत; ते जिवंत राहतात. 💖

दौलत वैद्य परिवारातील मुख्य घटक हरपला: शांताराम दादांच्या निधनाने कुटुंब प्रमुख गमावला.

आधुनिकतेच्या या युगात पारंपरिक कुटुंब मूल्यांचे महत्त्व हळूहळू कमी होताना दिसत आहे; परंतु राजपूत समाजातील दौलत वैद्य परिवाराने या मूल्यांना कायम ठेवले होते. शांताराम दादा यांचे निधन हा त्यांच्या कुटुंबासाठी एक भयंकर धक्का आहे, कारण त्यांनी आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबाचे एकता आणि प्रेमाचे धागे हरवले आहेत. 💔

Read More 💔 **दौलत वैद्य परिवारातील एक अनमोल व्यक्तिमत्व हरपले** 🕊️

श्री. एडवोकेट कुणाल के राजपूत यांचे वडील केवलसिंग छत्रसिंग राजपूत (जाधव) यांचे निधन

श्री. एडवोकेट कुणाल के राजपूत यांचे वडील केवलसिंग छत्रसिंग राजपूत (जाधव) यांचे निधन

दिनांक 09/12/2024 रोजी एक दु:खद घटना घडली, ज्याने राजपूत समाजामध्ये शोककळा पसरली. श्री. केवलसिंग छत्रसिंग राजपूत (जाधव), ज्यांचे जीवन समाजासाठी समर्पित होते, आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या निधनामुळे एडवोकेट कुणाल के राजपूत यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हृदयद्रावक दुखः आहे. त्यांचे जीवन, कार्य आणि राजपूत समाजामध्ये त्यांच्या योगदानाबद्दल नेहमीच प्रशंसा होत असते

केवलसिंग छत्रसिंग राजपूत (जाधव) यांचा जन्म एक प्रतिष्ठित राजपूत कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा वारसा आणि मूल्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये जपली. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या चारित्र्यावर आदर्श ठेवणार्‍या वारसांमध्ये एक विशेष व खारीची जबाबदारी उभी राहिली आहे.


केवलसिंग यांचा शोकाकुल कुटुंबात त्यांचे बंधू दरबारसिंग सुरतसिंग राजपूत आणि नारायणसिंग सुरतसिंग जाधव यांचे भावनात्मक नातेसंबंध कायम राहिले. याशिवाय, पुतण्या सतपालसिंग देवीसिंग जाधव यांचा सहवास देखील त्यांच्यासोबत राहिला. कुणाल के राजपूत, ज्यांना त्यांच्या वडिलांची कार्ये समृद्ध करायची आहे, आपण समाजात सक्रियपणे योगदान देत आहेत. धार्मिक कार्यक्रम असो की समाजातील मोठमोठे प्रसंग असे की समाजावर येणारे संकट असून यात एडवोकेट कुणाल यांचा सहभाग हा अधोरेखित असतो

त्यांच्या निधनानंतर, मांडळ शिवारातील त्यांच्या राहत्या घरातून त्यांच्या अंतिम शोकाकुल वातावरणात प्रवास केला गेला. ठिकाण होते – प्लॉट नं. 47 ब महावीर विहार सेक्टर 2, हॉटेल साहेबा समोर, मांडळ ता. शिरपूर, जि. धुळे.

श्री. केवलसिंग छत्रसिंग राजपूत (जाधव) यांचे निधन फक्त त्यांच्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण राजपूत समाजासाठी एक मोठा धक्का आहे. त्यांच्या आयुष्यातील योगदान आणि सेवा सदैव स्मरणात राहतील. कुणाल के राजपूत व त्यांच्या परिवाराला या कठोर काळात धैर्य आणि शक्यता देण्याचे हे एक योग्य क्षण आहे. दैनिक राष्ट्र उदय व पोलीस टुडे परिवार हा एक पारिवारिक घटक आहे संपूर्ण समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन 💔

शोक आणि श्रद्धांजलीचा हा काळ त्यांच्या स्मृतीस अरविंद आणि चिरंतन शांती देवो.

सुनिल रमेश आसापुरे यांची आई कै. कुसुमताई रमेश आसापुरे दुख:द निधन

*⚫शोक संदेश ⚫*
*सूर्यवंशी( बारी )समाजातील सर्व समाज बांधव आणि आप्तेष्ट नातेवाईक यांना कळविण्यात येते की, शिरपूर येथील श्री. सुनिल रमेश आसापुरे यांची आई कै. कुसुमताई रमेश आसापुरे वय- ७४ वर्ष यांचे दि.०३/११/२०२४ वार रविवार रोजी सकाळी ३:४५ वाजता अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा दि.०३/११/२०२४ रोजी दुपारी ०२:०० वाजता राहते घर ४अ, कुसुमव्हीला, ओम नगर आशिर्वाद हॉस्पिटलच्या मागे शिरपूर येथुन निघेल याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती 🙏😥*

*💐आपले शोकाकुल 💐*
*श्री. सुनिल रमेश आसापुरे (मुलगा)*
*श्री. राजेश रमेश आसापुरे (मुलगा)*

*समस्त आसापुरे परिवार शिरपूर*

स्व.चंदन आबा यांना विनम्र अभिवादन!

*मरावे परी किर्तीरुपी उरावे*
*आयुष्य जगतांना असे जगावे*
*कि, इहलोकी गेल्यावर आपणच*
*आदर्श उदाहरण ठरावे..*
असे लोकप्रिय, स्वाभिमानी, सामाजिक बांधिलकी जपणारे, स्पष्टवक्ता, सामान्य जनतेचे कैवारी, प्रतिष्ठित, नामी किर्तीवन्त व्यक्तिमत्व म्हणजे
*आदरणीय चंदन आबा*
*तृतीय पुण्यस्मरणानिमित्त*
*उद्या सामूहिक श्रध्दांजली चा कार्यक्रम आयोजित केला आहे.*
*दि. २|११|२०२४*
*वेळ. सकाळी ०९:३० वाजता*
*स्थळ: नेताजी केबल, कॉटेज हाॅस्पिटल जवळ, शिरपूर*

सुगंध चंदनाचा
कर्तृत्वाचा महामेरू, मनोभावे ज्यांना करती वंदन.
सुगंध दरवळतो अजूनही असे जनसेवेत झिजले चंदन.
बल भीम वज्र हनुमानाची प्रतिबिंबीत जणू छाया.
नवल वाटते कशी पोखरली एवढी बलशाली काया.
उजळत्या सुर्याची मध्यान्हात काळी रात्र झाली आज.
राजा गेला सिंहासन दुर्बल झाले संपले वैशाली राज.
शरिरा एवढेच सुदृढ निष्पाप परोपकारी होते मन.
पंखाविना पक्षी जणू, सर्वत्र पसरेल पोरके पण.
कर्तृत्वाचा ठसा असा कि सर्वत्र अबाधित आहे किर्ती.
देवा का दुभंगली माझ्याच घरची त्रिमूर्ती.
गोर गरिबांचा कैवारी त्यांची भक्ती ही साधी भोळी.
तूच तर रंग भरले देवा मग का अर्ध्यातच पुसली रांगोळी.
एवढ्या मोठ्या विभूतीला आम्ही कसे विसरू.
आमचे तर डोळ्यातच लपवतो पण कसे पुसू जनतेचे अश्रू.
एकटे असताना मात्र करितो आसवांची वाट मोकळी.
आयुष्यात निर्माण झाली कदापी न भरणारी पोकळी.
भावना मांडताना माहीत नाही कसा राहीला मनावर ताबा.
एकाकी आयुष्यात ना बाबा राहिले ना आबा.
. कवी – अंबादास सिसोदिया भवाळे