Green Hydrogen: Fueling a Sustainable Tomorrow
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Read More AI-Powered Healthcare: Revolutionizing Patient Care
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Read More AI-Powered Healthcare: Revolutionizing Patient Care
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Read More AI-Powered Healthcare: Revolutionizing Patient Care

*कृषी दिनी शिवाजी राजपूत यांच्या वनश्री ऑक्सिजन पार्क मध्ये पाचव्या बांबू प्लांटेशनचा उत्साहात वाढदिवस साजरा*
१ जुलै कृषी दिन शेतीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कै. मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे अवचित साधून पूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवली जातात. मात्र शिरपूर तालुक्यातील भोरखेडा गावातील ‘वनश्री ऑक्सिजन पार्क’ मध्ये एक आगळा -वेगळा पर्यावरण पूरक आणि प्रेरणादायी कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते म्हणजे आदरणीय शिवाजी राजपूत यांच्या बांबू प्लांटेशनचा वाढदिवस होय. यावर्षी १ जुलै २०२५ रोजी या बांबू प्लांटेशनचा ५ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २०२० साली ५० एकर क्षेत्रावर विविध भागात १९ प्रजातींच्या बांबूची लागवड करून सुरु केलेला उपक्रम आज एक पर्यावरण चळवळ बनून उभा आहे. ह्या कार्यकामाची सुरुवात वाढदिवसाच्या केक आणि फीत कापून करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू, प्रशासन व कृषी विभातील अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. यानंतर वन भोजनाचे आयोजन करून परंपारिक पद्धतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. शिवाजी राजपूत प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. शिवाजी राजपूत हे फक्त वृक्ष मित्र म्हणूनच नव्हे तर ते कृषी मित्र म्हणून ही ओळकले जातात.

त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून संकल्पनेतून निसर्ग संवर्धनाचे काम हाती घेतले आहे, ते अतुलनीय आहे. आज ही प्रत्येकाच्या वाढदिवस वृक्ष लावून साजरा करण्याची त्यांची परंपरा सुरु आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांचे वाढदिवस ते वृक्ष लावून साजरे केले आहेत व करत असतात. हे वृक्ष लागवड केले ही नाही तर त्यांची जतन व संगोपन देखील व्यवस्थित रित्या केली आहे. आणि त्याची दखल राज्य किंवा अंतर राष्ट्रीय स्थरावर ही घेण्यात आली आहे. आज वर त्यांना विविध राज्यशासकीय, केंद्रशासकीय, खाजगी तसेच अंतर राष्ट्रीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. बांबू लागवड ही पर्यावरनाच्या दृष्टीने फायदेशीर आहे, तितकीच ती शेतकऱ्यांसाठी नविन उत्पन्नाचे स्रोत देखील ठरते असे शिवाजी राजपूत यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.

बांबू म्हणजे हरीत क्रांतीचा नविन अध्याय, त्यातून मिळणारे फायदे हे केवळ पर्यावर्णापुरते मर्यादित नाहीत तर शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक श्वास्वतीचा मार्ग आहे. असे ते म्हणाले बांबू चा विविध प्रजातींमुळे जमिनीची गुणवत्ता सुधरते, पाण्याचे संचयन होते, जमिनीची धूप थांबते आणि त्याचे कागद, इंधन, बांधकाम साहित्य, हस्तकला साहित्य यासारख्या विविध क्षेत्रात उपयोग होतो. हे सर्व पर्यावरण आणि अर्थ व्यवस्थेत पूरक आहे.’वनश्री ऑक्सिजन पार्क ‘ केवळ बांबू लागवडी पुरता मर्यादित न राहता पर्यावरण शिक्षण केंद्र, शालेय शिक्षण सहलिंचे आकर्षण आणि शेतकऱ्यांसाठी बांबू प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आलेल आहे. शिवाजी राजपूत यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. कि एकटा माणूसही आपल्या संकल्पनेतून जंगल फुलवू शकतो एक मानवनिर्मित जंगल उभे केल आहे

या कार्यक्रमासाठी यशस्वी आयोजनाचे स्थानिक, ग्रामस्थ, शेतकरी बांधव यांचे मोठे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी, सामाजिक वनकरण विभागाचे राधिका फलफले, वन विभागाचे अधिकारी भूषण पाटील, शिरपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी थाळनेर सहाय्यक पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, शिरपूर न.परिषदचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, गट विकास अधिकारी प्रदिप पवार, कृषी अधिकारी योगेश गिरासे, राजेश चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन नरेंद्रसिंग सिसोदिया, चार्टर्ड अकाउंटंट अंकित शेवाळे, उद्योजक प्रसाद पाटील, भोरखेडा गावाचे उपसरपंच प्रशांत राजपूत, सहाय्यक गट विकास अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी वैशाली गिरासे, शितल गिरासे, पत्रकार महेंद्र राजपूत, प्रमोद राजपूत, युवराज भाऊसाहेब,महेश गिरासे, संग्रामसिंग पवार यासह मित्र परिवार आणि शेतकरी बांधव उपस्थित होते
