चिमुकलीचा गळा घोटून पित्याची आत्महत्या : पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयाने शहर सुन्न

चिमुकलीचा गळा घोटून पित्याची आत्महत्या : पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयाने शहर सुन्न

दैनिक राष्ट्र उदय विशेष प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या स्वप्निल दीपक गायकवाड (वय 34) या अंमलदाराने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा घोटून खून केला आणि नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. ही दुहेरी घटना समजताच नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला.

स्वप्निल हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल रात्री उशिरा त्यांच्या घरात ही घटना उघडकीस आली. भैरवी स्वप्निल गायकवाड (वय 6) ही बालिका पाळणा बांधण्याच्या लोखंडी हुकाला गळफास लावून मृतावस्थेत सापडली, तर बाजूलाच स्वप्निल गायकवाड यांचा ही मृतदेह आढळून आला.

कौटुंबिक विघटन, तणाव आणि आत्मविस्मृती

स्वप्निल यांचा काही महिन्यांपूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला होता. कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना इतरांचे जीवन वाचवण्याचं काम असतं, पण येथे स्वतः पोलीसच हतबल होऊन जग सोडून गेला.

स्वप्निल यांच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई-वडील एकटे उरले आहेत. काही वर्षांपूर्वी एका भावाचा गंभीर आजाराने मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. अशा काळात एकमेव आधार असलेला मुलगाही गेला आणि त्यांच्या जीवनात अंधार दाटून आला.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

मन सुन्न करणारे प्रश्न

आजवर अनेकांनी आत्महत्येपासून माघार घ्यावी म्हणून सल्ले दिलेले असतात, समुपदेशन केलेले असते. पण ज्याच्या खांद्यावर इतरांना आधार देण्याची जबाबदारी होती, तोच जर तुटून पडला, तर मग समाजाने विचार करायला हवं नाही का?

एक चिमुकली – निष्पाप, निरागस आणि जीवनाच्या सुरुवातीला असलेली – तिला या जगातून का जावं लागलं? तिचा काय दोष होता? कोण म्हणतं फक्त महिला हतबल होतात – येथे एक पुरुषही तुटून कोसळला, आणि संपूर्ण समाजासाठी एक गंभीर संदेश ठेवून गेला.

तरुण पिढीला साकडे

आज आपल्या भोवतालच्या तणाव, कौटुंबिक संघर्ष, नात्यांतील दुरावा आणि मानसिक आरोग्य याबद्दल बोलणं गरजेचं झालं आहे. कोणताही निर्णय शेवट नसतो. आई-वडिलांचा, आपल्या लोकांचा विचार करा. तुम्ही हरलात, तर तुमचं संपूर्ण घर हरतं.

हा शोकांतिकेचा प्रसंग तरुण पिढीला जागं करेल का? की अजूनही आपण सोशल मीडियावर फिल्टर लावून जीवनाला झाकत बसू?
आत्महत्येचा विचार मनात आला, तर थांबा… विचार करा… आणि मदत घ्या.

> जीवन अमूल्य आहे. संकटं आली की मोडायचं नाही – झेलायचं आणि उभं राहायचं.

🙏 भैरवी आणि स्वप्निल यांच्या आत्म्यास शांती लाभो…
आई-वडिलांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

*सचिन सरदारसिंग राजपूत: एक प्रेरणादायक हँडबॉल शिक्षक ज्याचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन* 🕊️💔

 

*सचिन सरदारसिंग राजपूत: एक प्रेरणादायक हँडबॉल शिक्षक ज्याचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन* 🕊️💔

🎓 सचिन राजपूत हे शिरपूर एज्युकेशन सोसायटीमध्ये हँडबॉल शिक्षक होते, ज्यांना हृदयाच्या झटक्यात जीव गमवावा लागला. खेळताना त्याला येणाऱ्या तीव्र झटकेमुळे तातडीने *डॉक्टर विनोद पावरा यांच्या गुरुदेव हॉस्पिटलमध्ये* दाखल करण्यात आले. 🏥 डॉक्टरांनी सात ते आठ वेळा DC आणि CPR दिला, ज्यामुळे थोडा आशा मिळाला, परंतु आणखी पुढे त्याला धुळ्याच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
🩺 *आरोग्यधूत आरोग्य मित्र बापू राजपूत* यांच्या नेहमीच्या सामाजिक सेवेतील संपर्कातील असलेल्या वैधकिय क्षेत्रातील दांडगा संपर्क या वेळेस कामी आला आणि विना विलंब त्यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक *डॉक्टर विकास राजपूत* यांना तातडीने माहिती देऊन सर्व तयारी येण्या पूर्वी करून ठेवली गेली. तिथे विघ्नहर्ता हॉस्पिटलचे टीमने दहा दिवसांच्या अविरत प्रयत्नांनंतरही दुर्दैवाने यश मिलाळे नाही. 😢💔


दहा दिवस शर्तीचे प्रयत्न केलेत मात्र या सर्व प्रयत्नांना अपयश आले या सर्व घडामोडींमध्ये डॉक्टर विनोद पावरा आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल ची पूर्ण टीम डॉक्टर विकास राजपूत यांच्यासह या परिवारातील काका बाबांचे मार्गदर्शन तर होतेच परंतु या सर्व सख्खे व चुलत भावांमधील जे टीमवर्क पाहायला मिळाले (दीपक अतुल विकी करण निलेश लुकेश आशिष दिपेन) त्याला एकदा खरोखर सलाम केला पाहिजे एवढे धाडसी निर्णय त्यांनी घेतले व अविरत 100% घरी कसा परत येईल यासाठी प्रयत्न केले *त्यांच्या या प्रयत्नांना साथ दिली त्यांच्या सर्व मित्रांनी त्यात निखिल सुचित जगदीश*  याच्या सह अनेकांची नावे घेता येतील  परंतु चिरंजीव देवांश साठी सचिन ला वाचविण्याचे केलेले प्रयत्न अपूर्ण पडले
सचिन सरदारसिंग राजपूत हे एक आदर्श शिक्षक होते, ज्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त खेळाचे शिक्षणच नाही, तर शारीरिक आणि मानसिक विकासासाठीही प्रेरित केले. 🏐💪 त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे आणि प्रेमामुळे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण केले. ❤️✨ परंतु दुर्दैवाने, हृदयाच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण समुदाय शोकात आहे.

Read More *सचिन सरदारसिंग राजपूत: एक प्रेरणादायक हँडबॉल शिक्षक ज्याचे हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन* 🕊️💔

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सूचना बनावट खते, बियाणे, कीटकनाशकांच्या प्रकरणात दोषींना राज्यांनी कठोर शिक्षा द्यावी !

*बनावट खते, बियाणे, कीटकनाशकांच्या प्रकरणात दोषींना राज्यांनी कठोर शिक्षा द्यावी

धुळे जळगाव नंदुरबार नाशिक नगर या जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी कंपनी मालकांना संशयास्पद मदत करतात असे देखील आरोप सध्या होत आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क करावा

शिरपूरचे सात्विक आणि भाविक आमदार काशीराम दादा पावरा यांनी टोल नाका प्रशासनाला पत्र देऊन भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले

 

 

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सूचना
नवी दिल्ली  :-  देशातील शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत चांगल्या दर्जाची खते, बियाणे
आणि कीटकनाशके मिळतील, याची खात्री केली पाहिजे. जर बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळत असतील तर शेतकऱ्यांच्या हितासाठी दोषींवर कठोर आणि प्रभावी कारवाई राज्यांनी करायला हवी, अशा सूचना केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे कृषी मंत्रालयाचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कीटकनाशके, बियाणे आणि खते नेहमी उपलब्ध करून दिली पाहिजेत, यावर भर दिला. मंत्री चौहान म्हणाले की, आगामी पीक हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी ते लवकरच राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
याचे कारण म्हणजे प्रामुख्याने राज्यस्तरावरच प्रभावी उपाययोजना केल्या जातात. शेतकऱ्यांना दर्जेदार कीटकनाशके आणि खते मिळावीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रित मोहीम राबवावी, असेही केंद्रीय मंत्री चौहान यांनी सांगितले. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी खते, बियाणे आणि कीटकनाशकांबाबत मोहीम राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले.

शिरपुरात डिजिटल मार्केटिंग चा धमाका खालील नंबर वर संपर्क करा

जेणेकरून ही मोहीम देशभरात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारांमार्फत विनाविलंब प्रभावीपणे राबवता येईल. यावेळी चौहान म्हणाले की, यासंदर्भात शेतकऱ्यांकडूनही अभिप्राय, मते घेण्यात यावीत, कारण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या बी-बियाणांमुळे शेतकऱ्यांवरच प्रभाव पडतो आणि पिकांचे नुकसान होते.

पत्रकार बांधवांसाठी खुशखबर दैनिक राष्ट्र उदय कार्यालयात आपल्याला आपली वेबसाईट धमाकात सुरू करण्यासाठी संपर्क करा लक्ष्मीकांत सोनार

9209293194

*अटकेचा आधार* व *अटकेची कारणे* यातील फरक काय आहे?
  1. *अटकेचा आधार* व
    *अटकेची कारणे*
    यातील फरक काय आहे?

आणि आरोपीला अटक करतांना तो नेमका कसा लिहावा , याचा उहापोह मी या व्हिडिओत केला आहे.
व्हिडिओ जेव्हा अपलोड केला होता त्या वेळेस निवडणुकीच्या कामात आपण व्यस्त असल्यामुळे कदाचित तो पाहिला गेला नसेल तर कृपया नक्की पाहून घ्या , अन्यथा त्या *तांत्रिक गोष्टीमुळे आरोपीला जामीन मिळेल आणि तपासी अधिकारी यांच्या विरुध्द चौकशी लागू शकते.*

*व्हिडिओ लिंक* 👇👇👇