Apple Unveils iPhone 17 with Groundbreaking AI Features and Battery Life
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Read More Apple Unveils iPhone 17 with Groundbreaking AI Features and Battery Life
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Read More Apple Unveils iPhone 17 with Groundbreaking AI Features and Battery Life
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Read More AI-Powered Healthcare: Revolutionizing Patient Care
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing mollis dolor facilisis porttitor.
मजूर हनुमंत चौरे यांच्या चार सख्ख्या मुलींची मुंबई पोलीस दलात भरती; जिवाचीवाडीसह महाराष्ट्राचा अभिमान

बीड | केज तालुका
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील कु. उषा हनुमंत चौरे, कु. अर्चना हनुमंत चौरे, कु. शीतल हनुमंत चौरे आणि कु. गीतांजली हनुमंत चौरे या चार सख्ख्या बहिणींनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करत मिळवलेले हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
त्यांचे वडील हनुमंत चौरे आणि आई हे वर्षानुवर्षे ऊसतोड मजूर म्हणून कष्ट करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पशुपालन करूनही त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. “मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे,” हा त्यांचा निर्धारच आज या ऐतिहासिक यशामागील खरी ताकद ठरला.
चारही बहिणींनी शिक्षणासाठी वसतिगृहात राहून पोलीस भरतीची तयारी केली. नियमित अभ्यास, कठोर शारीरिक सराव आणि अविरत मेहनतीच्या बळावर त्यांनी एकाच वेळी मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले.
आपल्या भावना व्यक्त करत हनुमंत चौरे म्हणाले, “आयुष्यभर कष्ट केले, पण मुलींना शिकवण्याचा निर्धार कधी सोडला नाही. आज आमच्या चारही मुली पोलीस दलात दाखल झाल्या, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही.”
एकाच कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींची एकाच वेळी पोलीस दलात भरती होणे ही दुर्मीळ आणि अभिमानास्पद घटना आहे. त्यांच्या या यशामुळे जिवाचीवाडी गाव, केज तालुका आणि बीड जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गौरवाने घेतले जात आहे.
ही यशोगाथा प्रत्येक तरुण-तरुणीला एकच संदेश देते—
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते.”
कु. उषा हनुमंत चौरे, कु. अर्चना हनुमंत चौरे, कु. शीतल हनुमंत चौरे आणि कु. गीतांजली हनुमंत चौरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳👮
संदिप बबनराव धात्रक – सहाय्यक संपादक
मो ९४२००००९४२
नवी दिल्ली, दि. 30 जून : भारतीय लष्कराचे 31 वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ (पीव्हीएसएम, यूवायएसएम, एव्हीएसएम) यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. त्यांनी निवृत्त होणारे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. जनरल द्विवेदी यांनी चार दशकांच्या उल्लेखनीय सेवेनंतर 30 जून रोजी सेवानिवृत्ती घेतली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला येथील माजी विद्यार्थी असलेले जनरल धीरज सेठ यांनी डिसेंबर 1986 मध्ये आर्मर्ड कॉर्प्समध्ये अधिकारी म्हणून भारतीय लष्करात प्रवेश केला. जवळपास चार दशकांच्या सेवाकाळात त्यांनी सामरिक नियोजन, क्षमता विकास, दल व्यवस्थापन आणि संस्थात्मक परिवर्तन या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांनी वाळवंटी भागातील आर्मर्ड रेजिमेंट, पश्चिम आघाडीवरील आर्मर्ड ब्रिगेड तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी दलाचे नेतृत्व केले आहे. लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी भारतीय लष्कराच्या प्रतिष्ठित ‘सुदर्शन चक्र’ स्ट्राइक फॉर्मेशनचे नेतृत्वही यशस्वीपणे केले.

लष्कर मुख्यालयात सामरिक नियोजन आणि क्षमता विकासाशी संबंधित महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असताना त्यांनी भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण, दीर्घकालीन क्षमता विकास आणि भविष्यातील युद्धतंत्राशी सुसंगत दल उभारणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
जनरल सेठ हे हायर कमांड कोर्स, राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय तसेच फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित प्रतिष्ठित कमांड अँड स्टाफ कोर्सचे पदवीधर आहेत. व्यावसायिक लष्करी शिक्षणातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते उत्कृष्ट सामरिक नेतृत्व आणि दूरदृष्टी असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात.
संदिप धात्रक मो. 9420000942
अतिथी संपादक
कर्नल विक्रम सुधीर बेनके यांची ब्रिगेडियर पदावर नियुक्ती; जुन्नर तालुक्यासह खानदेशा कसमादे विभागात आनंदाचे वातावरण
नाशिक | संदिप धात्रक – ९४२००००९४२
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पवित्र किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जन्मलेल्या *कर्नल विक्रम सुधीर बेनके* यांनी भारतीय सेनेत आपल्या कर्तृत्वाची आणखी एक ऐतिहासिक छाप उमटवत ब्रिगेडियर पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देशसेवा, शिस्त आणि नेतृत्वाच्या बळावर *ब्रिगेडियर* पदापर्यंत पोहोचलेल्या विक्रम बेनके यांच्या यशामुळे तरुण पिढीला भारतीय सैन्यात करिअर करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल शेतकरी संघटनेचे नेते तानाजी बेनके, माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांच्या पत्नी राजश्री बेनके, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके, डॉ. अमोल बेनके, गौरी बेनके, धनश्री बेनके, डॉ. पल्लवी बेनके, योगेश बेनके, सुधीर फुलवडे, विनायक तांबे, डॉ. फुलवडे आणि दयानंद डुंबरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ब्रिगेडियर विक्रम बेनके यांनी सांगितले की,
*“देशसेवा हे प्रत्येक तरुणाचे ध्येय असले पाहिजे. जुन्नर तालुक्यात शेतकरी मोठ्या संख्येने आहेत; मात्र जवानांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. जवान आणि किसान हे राष्ट्रनिर्मितीचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत. दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केल्यास देशाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल.”*सैन्य नेतृत्वाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “सैनिकांच्या कामगिरीमागे त्यांचे समर्पण आणि मेहनत असते. नेतृत्वाची खरी जबाबदारी म्हणजे सैनिकांच्या यशाचे श्रेय त्यांना देणे.”
*ब्रिगेडियर बेनके यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ पत्नी आणि संपूर्ण कुटुंबीयांना दिले.*
*विशेष खास अभिनंदन* म्हणजे, ब्रिगेडियर विक्रम बेनके हे खानदेशातील शेतकरी चळवळीचे झुंजार नेते स्वर्गीय नरेंद्र अहिरे यांचे जावई आहेत. त्यामुळे खानदेशातही त्यांच्या या यशाबद्दल अभिमानाची भावना व्यक्त होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिवनेरीच्या मातीतून घडलेले हे नेतृत्व देशसेवेचे प्रेरणास्थान ठरत असून — “जवानांचा सन्मान आणि किसानांचा अभिमान” हा राष्ट्रनिर्मितीचा संदेश त्यांनी दिला आहे.
२०२१ ते २०२३ चे पुरस्कार अद्याप प्रलंबित; जुन्या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने २०२५ च्या स्पर्धेकडे पत्रकारांची पाठ
नाशिक : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी विविध पत्रकारिता पुरस्कार जाहीर केले जातात. मात्र, सन २०२१, २०२२ आणि २०२३ या सलग तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर होऊनही आजतागायत प्रत्यक्ष वितरण न झाल्याने राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कारणामुळे सन २०२५ च्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेकडे अनेक पत्रकारांनी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तलेख, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रण, समाजमाध्यमातील उत्कृष्ट कार्य तसेच स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी विविध पुरस्कारांसाठी शासनाने प्रवेशिका मागवल्या आहेत. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ होती. मात्र, अत्यल्प प्रतिसादामुळे ही मुदत वाढवून ३१ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली होती. तरीही पत्रकारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळला नव्हता.
यामागील प्रमुख कारण म्हणजे मागील तीन वर्षांचे पुरस्कार अद्याप वितरित झालेले नाहीत. पत्रकारांचे म्हणणे आहे की, “जुने पुरस्कारच मिळाले नाहीत, तर नवीन स्पर्धेत सहभागी होऊन काय उपयोग?” मागील वर्षी जून-जुलैमध्ये २०२१, २०२२ आणि २०२३ च्या पुरस्कारार्थींची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. निकाल जाहीर झाले; मात्र पुरस्कार वितरणाचा सोहळा आजपर्यंत आयोजित करण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या घोषणाच केवळ कागदावर राहिल्याची भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, नाशिक विभागातील तीन वर्षांच्या पुरस्कार वितरणाच्या रकमेसाठी अवघ्या सुमारे २० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. राज्य शासन विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना पत्रकारांच्या सन्मानासाठी आवश्यक असलेला हा अल्प निधीही उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनाच शासनाच्या पुरस्कारांपासून वर्षानुवर्षे वंचित ठेवले जात असल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी आहे. पुरस्कार जाहीर करूनही त्यांचे वितरण न होणे ही प्रशासनाच्या उदासीनतेची बाब असल्याची टीका पत्रकारांकडून होत आहे.

याचा परिणाम पुरस्कार स्पर्धेतील सहभागावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. नाशिक विभागात सन २०२१ मध्ये अपेक्षित २० पैकी १६, सन २०२२ मध्ये १३ आणि सन २०२३ मध्ये केवळ १० प्रवेशिका प्राप्त झाल्या. सलग तीन वर्षांत सुमारे २० ते २१ पत्रकारांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली असून, शासनाच्या पुरस्कार प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कारासह, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार अशा विविध पुरस्कारांसाठी ५१ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष पुरस्कार वितरणच होत नसल्याने या योजनांचा उद्देशच फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांमधून व्यक्त होत आहे.
पत्रकारांची मागणी आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन २०२१, २०२२ आणि २०२३ या प्रलंबित पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण लवकरात लवकर आयोजित करावे. तसेच सर्व प्रलंबित पुरस्कारांचे वितरण करून पत्रकारांचा शासनावरील विश्वास पुन्हा दृढ करावा.
राज्यभरातील पत्रकारांचे लक्ष आता शासनाच्या निर्णयाकडे लागले असून, या वृत्ताची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रशासनाने पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करावी, अशी जोरदार मागणी पत्रकारांकडून होत आहे.